आमचं दृष्टीकोन
“शिवरायांच्या विचारांची पालखी खांद्यावर घेऊन, स्वराज्याची खरी ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे.”
आमचा दृष्टीकोन असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी विचार, राष्ट्रप्रेम, निसर्गस्नेह आणि शौर्य नव्या पिढीपर्यंत फक्त पुस्तकांतून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून पोहोचावे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे जतन, त्यांच्या इतिहासाचा जागर, आणि निसर्गसंपत्तीचे संरक्षण हे आमच्या कार्याचं मूळ आहे.
स्वराज्य परिवार म्हणून आम्ही अशी तरुण पिढी घडवू इच्छितो जी इतिहासाभिमानी, निसर्गप्रेमी, आणि जबाबदार नागरिक असेल – जिच्या विचारांमध्ये ‘स्वराज्य’ ही संकल्पना केवळ भूतकाळ नसून वर्तमान आणि भविष्याचा प्रेरणास्रोत ठरेल.
आमचं ध्येय
“गड-किल्ल्यांचा इतिहास व स्वराज्याचे विचार जनतेपर्यंत पोहोचवून, देशाभिमान आणि सामाजिक भान जागवणे.”
स्वराज्य परिवाराचं ध्येय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचं जतन करणं, त्यांच्या इतिहासाचा प्रचार आणि प्रसार करणं, आणि गिर्यारोहणाच्या माध्यमातून तरुणांमध्ये निसर्गप्रेम, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करणं.
आम्ही दरवर्षी विविध किल्ल्यांवर शिवप्रेरणादायी मोहीमा, इतिहास समजावणाऱ्या फेरी, आणि स्वच्छता व संवर्धन उपक्रमांचे आयोजन करून स्वराज्याची खरी भावना अनुभवण्याची संधी निर्माण करतो.
आमच्या सेवा
प्रेरणादायी प्रवास – छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडीत गड-किल्ल्यांवर अभ्यासपूर्ण, मार्गदर्शित आणि सुरक्षित प्रवास.
इतिहासाची सैर – गड-किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास, शौर्यगाथा आणि स्थानिक दंतकथा सांगणारे माहितीपूर्ण सत्र.
निसर्गसंपन्न मनोरंजन – निसर्गाच्या सानिध्यात खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, छायाचित्रण आणि समूहिक उपक्रम.
पौष्टिक नाश्ता आणि पारंपरिक जेवण – प्रवासात चविष्ट, स्थानिक पदार्थांचा नाश्ता आणि पारंपरिक मराठमोळं जेवण.
सामाजिक आणि सांस्कृतिक जागर – स्वराज्याचे विचार, सामाजिक मूल्ये आणि देशप्रेम जागवण्यासाठी विशेष सत्रे.